Other Activities

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे आदिवासी, शेतकरी, कष्टकरी समाज व्यवस्थेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. सातपुड्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बंधू-भागीनिपर्यंत शिक्षणाची गंगा नेण्याचे कार्य विद्यापीठ अनेक वर्षांपासून करीत आहे. याचाच एक भाग म्हणून विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालय व प्रशालांमध्ये शिक्षण घेणाऱ्या परन्तु आपल्या कुटुंबात प्रथम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी विद्यापीठाने सावित्रीबाई फुले प्रथम शिक्षित विद्यार्थिनी पुरस्कार सुरु केला आहे.
उद्दिष्ट्य: सदर पुरस्काराच्या माध्यमातून कुटुंबातून प्रथम शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा उत्साह वाढविणे व तिला आर्थिक मदत करणे.
पुरस्कारासाठी एकूण तरतूद: रु. १ लक्ष

नियम व अटी :
  1. पुरस्कारासाठी अर्ज करणारी विद्यार्थिनी ही विद्यापीठ प्रशाळा किंवा महाविद्यालयात नियमित प्रवेशीत विद्यार्थिनी असणे आवश्यक
  2. अशिक्षित आई-वडील असलेल्या कुटुंबातून शिक्षण घेणारी ती प्रथम मुलगी असावी मोठा भाऊ किंवा लहान बहिण/ भाऊ शिक्षित किंवा शिकत असल्यासही सदर विद्यार्थिनी हि प्रथम शिक्षित विद्यार्थिनी म्हणून गणली जाईल.
  3. सदर विद्यार्थिनीच्या अगोदर तिची वडील बहिण जर शिक्षित असेल तर सदर विद्यार्थिनी पुरस्कारास पात्र ठरणार नाही.
  4. सदर पुरस्कारासाठी अर्ज करतांना महाविद्यालयाने अर्जासोबत विद्यार्थिनीचे प्राचार्यांच्या सहीचे व महाविद्यालयाच्या शिक्क्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र, सदर विद्यार्थिनी हि तिच्या कुटुंबातील प्रथम शिक्षित विद्यार्थिनी असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी विकास अधिकारी यांच्या सहीचे हामी पत्र, सोबतच पालकांचे हामी पत्र व विद्यार्थिनीचे मागील वर्षाचे गुणपत्रक असणे आवश्यक आहे.
  5. एका विद्यार्थिनीस एकच वेळेस सदर सन्मान मिळेल
  6. शाखेनुसार १२ वीच्या गुणांच्या आधारे गुणानुक्रम ठरविले जातील
  7. प्रती महाविद्यालय एका विद्यार्थिनींचा प्रस्ताव पाठवावा.

ईशान्य भारत म्हंटला कि तेथील संस्कृती, भौगोलिक आणि सामाजिक रचना अर्थात एकूणच व्यवस्था बाबत मराठी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम दिसून येतो. हा भाग किवा इथे रहाणारे लोक हे भारतीय बांधव आहेत याचा जणू विसर अनेकदा युवकांना पडून ते त्यांना शंकेच्या नजरेने पाहू लागतात. अशा शंकेखोर नजरांना महराष्ट्रात शिक्षण आणि नोकरीसाठी आलेली ईशान्य भारतीय तरुण मंडळी वैतागते. यामुळे दोन भारतीय तरुणांमध्येच बंधुभाव जागृत न होता शंका कुशंका निर्माण होतात. ईशान्य भारतीय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थी यांच्यात एक भातृभाव तयार करण्याच्या दृष्टीने सदर योजना सुरु करण्यात येत आहे.
संकल्पना: श्री राजेंद्रजी नन्नवरे, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, क.ब.चौ. उ. म. वी. जळगाव
एकूण तरतूद: रु. १० लक्ष

उद्दिष्ट्ये :
  1. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थी व ईशान्य भारतातील विद्यार्थांमध्ये परिचय वाढवीत दोहोंमध्ये भातृभाव निर्माण करणे.
  2. ईशान्य भारतातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, इत्यादी व्यवस्थांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे
  3. ईशान्य भारतातील निवडक विद्यापीठे व क.ब.चौ. उ.म.वि यांच्यात विविध विषयांवर सामंजस्य करार करणे.
क्रियान्वयन:
  1. ईशान्य भारत ओळख अभियान: या अंतर्गत निवडक विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल ईशान्य भारतातील निवडक राज्यांतील निवडक शहरांत आयोजित करणे यासाठी तेथील विद्यापीठांशी किंवा संस्थांसोबत संपर्क करून विद्यार्थ्यांची व्यवस्था करणे.
  2. सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रम: (Cultural Exchange Programme) : ईशान्य भारतातील संस्कृती व खान्देशी संस्कृतीचा मिलाप एकत्रित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून करणे. यात ईशान्य भारतातील लोककला व खान्देशी लोककला यांचा संयुक्त महोत्सव क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रथम आयोजित करणे. नंतर ईशान्य भारतातील सामंजस्य करार केलेल्या विद्यापीठात आयोजित करणे.
  3. नॉर्थ इस्ट फेलोशिप प्रोग्राम: यामध्ये ईशान्य भारतातील निवडक विद्यार्थ्यांना क.ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात पदवी, पद्युत्तर, सर्टिफिकेट, डिप्लोमा, इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देणे. किंवा सदर विद्यार्थ्यांना एक, दोन किंवा तीन महिन्यांच्या सर्टिफिकेट, डिप्लोमा, इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देणे. या साठीचा खर्च करणे. किंवा ज्या ईशान्य भारतातील ज्या विद्यापीठासोबत सामंजस्य करार झाला असेल अशा विद्यापीठात इकडील विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट, डिप्लोमा, इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेशित करणे. अर्थात सामंजस्य करार केलेल्या ईशान्य भारतातील विद्यापीठाने क.ब.चौ.उ.म.वि. च्या विद्यार्थ्यांची निःशुल्क व्यवस्था फेलोशिप च्या माध्यमातून करणे व क.ब.चौ.उ.म.वि ने तिकडील विद्यार्थ्यांची निःशुल्क व्यवस्था फेलोशिप च्या माध्यमातून करणे.
  4. नॉर्थ इस्ट-खान्देश रिसर्च अवार्ड: सामंजस्य करार झालेले विद्यापीठ व क.ब.चौ. उत्तर महारष्ट्र विद्यापीठ यांच्यातील विद्यार्थ्यांना एकत्रित सामाजिक, व्यवस्थापन व विज्ञान क्षेत्रात संशोधन करावयाचे असल्यास त्यांना एकत्रित रिसर्च अवार्ड देणे. ज्यात मिळणाऱ्या रकमेतून दोन्ही कडील विद्यार्थ्यांनी संशोधन करावे दोन्ही कडील विद्यार्थी एकमेकांकडील विद्यापीठांच्या प्रयोगशाळा, ग्रंथालय, इत्यादींचा लाभ घेऊ शकतील व त्यांचा एकमेकांच्या विद्यापीठांना भेट देण्यासाठीचा प्रवास खर्च यामध्ये देय्य असेल.

या खानदेश भूमीने अनेक साहित्यिक व कलावंतांसह शिवाजी लोटन पाटील, नितीन भास्कर यांच्यासारखी राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट चित्रपटांसाठी पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक सुद्धा तयार केले आहेत. युवा चित्रकर्मिंच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा व त्यांना चित्रपट क्षेत्रात नविन दालन निर्माण करून द्यावे यासाठी विद्यापीठातर्फे राष्ट्रीय लघुपट महोत्सव घेण्यात येत आहे.
संकल्पना: श्री राजेंद्रजी नन्नवरे, मा. व्यवस्थापन परिषद सदस्य, क.ब.चौ. उ. म. वी. जळगाव
एकूण तरतूद: रु. ३ लक्ष

उद्दिष्ट्ये :
  1. कवयित्री बहिणाबाई चौधारी उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना चित्रपट क्षेत्रासंबंधी दालन उपलब्ध करून देणे.
  2. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व त्यांच्यातील कलाकाराला वाव देणे.
  3. विद्यार्थ्यांमधून भविष्यातील उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलावंत, इत्यादी निर्मितीची प्रक्रिया तीव्र करणे.
क्रियान्वयन:
  1. सदर महोत्सव आयोजनासाठी इच्छुक असलेल्या महाविद्यालयास देण्यात येईल.
  2. सदर महोत्सव हा प्राप्त लघुपटांच्या संख्येनुसार एक किंवा दोन दिवसांचा असावा.
  3. महोत्सव घेण्यासाठी महाविद्यालयाकडे सुयोग्य दृकश्राव्य यंत्रणा किमान तीन सभागृहांमध्ये राबविता येईल अशी व्यवस्था असावी.
  4. महोत्सवा दरम्यान लाघुपटांच्या चित्रीकरणासह युवा चित्रकर्मिंसाठी त्या क्षेत्रातील मान्यवरांचे किमान दोन मार्गदर्शन वर्ग होतील. सोबतच खुली चर्चा, गटचर्चा असे विविध उपक्रम राबविले जातील.
  5. दरवर्षी महोत्सवासाठी विविध सामाजिक विषय दिले जातील त्यावरच लघुपट व माहितीपट स्वीकारले जातील.
  6. महोत्सवासाठी नियोजित खर्चात येणाऱ्या मान्यवरांचे स्वागत, निवास, भोजन, प्रवास भत्ता, पारितोषिके, प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांचे नाष्टा, भोजन, निवास, दृक श्राव्य यंत्रणा, इत्यादी खर्च करावा.
महोत्सवाचे नियम व अटी :
  1. लघूपट HD QUALITY (720p,1080p) आणि mp4 फॉरमॅट मध्ये असावा.
  2. लघुपट, डॉक्युमेंट्री, कॅम्पस फिल्म जास्तीत जास्त ४० मिनिटे इतका असावा.
  3. लघुपटाचे प्रसिद्धी साहित्य-पोस्टर(12.18 Size.jpeg) आणि कथा सारांश (synopsis) आणि क्रेडिट लिस्ट PDF मध्ये लघुपटाबरोबरच पाठवावे. हे साहित्य लघुपट महोत्सवाच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
  4. मराठी , प्रादेशिक बोलीभाषा ,संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी या भाषांव्यतिरिक्त भाषांमध्ये लघुपट असल्यास लघुपटाला मराठी, हिंदी किंवा इंग्रजी यापैकी कोणत्याही एका भाषेमध्ये उपशीर्षके (सबटायटल्स) द्यावे.
  5. सदर महोत्सवात २५ वर्षांखालील महविद्यालयीन विद्यार्थ्यांनाच प्रवेश घेता येईल.
  6. महोत्सवात सहभाग नोंदविणाऱ्या सहभागी विद्यार्थ्यास भोजन, निवास. इत्यादी बाबींसाठी प्रती विद्यार्थी रु ५००/- सहभाग शुल्क भरावे लागेल.
  7. महोत्सवास लघुपट पाठविणाऱ्या संघाने त्यांनी तयार केलेला लघुपट हा स्वरचीत, स्वलिखित व स्वनिर्मित आहे असे निर्माता, दिग्दर्शक, लेखक व प्राचार्यांच्या सहीचे हामी पत्र देणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रिया :
  1. प्रवेश शुल्क रुपये २००/- (दोनशे मात्र.)
  2. एकदा स्विकारलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही.
  3. एका फॉर्मद्वारे एकच लघुपट पाठवता येईल. एकापेक्षा जास्त लघुपटासाठी प्रत्येक वेळी वेगळा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  4. शुल्क मिळाल्यावरच स्पर्धेसाठी लघुपटाचा प्रवेश ग्राह्य धरला जाईल.
इतर सूचना :
  1. पाठविलेल्या लघुपटाबाबत कोणत्याही प्रकारचा कॉपीराईटचा प्रश्न उपस्थित झाल्यास त्याची जबाबदारी निर्माते किंवा तयार करणाऱ्या संघांची राहील. यासंदर्भात आयोजक कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेस उत्तरदायी राहणार नाहीत
लघुपट पाठवताना खालील गोष्टी निश्चित तपासा :
  1. लघुपटाची व्हिडीओ फाईल.
  2. पोस्टर, कथा सारांश आणि क्रेडिट लिस्ट.
  3. शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट.
उद्दिष्ट्ये :
  • तरुण विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यास वाव मिळावा.
  • देशभरातील विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे.
    1. कालावधी:
      प्रसिद्धी: ऑगस्ट
      निबंध मागविण्याची शेवटची दिनांक: २५ सप्टेबर
      स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरण : ऑक्टोबर/नोव्हेंबर
    2. स्पर्धेसाठी विषय: प्रत्येक वर्षी परिस्थितीनुरूप विषय जाहीर केले जातील
    3. समिती: दरवर्षी स्पर्धेसाठी समिती गठीत केली जाईल. जिचे कार्य स्पर्धेच्या निकालापर्यंत मर्यादित राहील.
    4. परीक्षक: भाषानिहाय प्रत्येकी तीन असे एकूण नऊ परीक्षक नेमले जातील.
स्पर्धेचे नियम:
  1. निबंध हा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील असावा.
  2. विद्यार्थ्यांने निबंध स्व हस्ताक्षरात लिहिलेला असावा.
  3. शब्द मर्यादा ८०० ते १००० शब्द इतकी असेल.
  4. निबंधाचे लेखन पाच सेमी समास सोडून ए-फोर कागदावर एकाच बाजूने असावे.
  5. स्पर्धकांनी आपले नाव, पत्ता, रोल नंबर, महाविद्यालयाचे व विद्यापीठाचे नाव, इत्यादी माहिती स्वतंत्र पानावर नमूद करावी.
  6. विहित मुदतीती प्राप्त झालेल्या निबंधांचाच विचार करण्यात येईल
  7. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  8. निबंध स्पर्धा निः शुल्क आहे
  9. महाविद्यालयाचे प्राचार्य/संचालक यांच्या पत्राशिवाय (कव्हरिंग लेटर) निबंध स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
पारितोषिक- भाषानिहाय (मराठी, हिंदी, इंग्रजी):
  • प्रथम : रु. ११०००/- मात्र, प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह
  • द्वितीय : रु. ७०००/- मात्र, प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह
  • तृतीय : रु. ५०००/- मात्र, प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह
Annual health check-up is organized for college students to provide medical aid to the student. By keeping the medical education training & its awareness as main objective of the university has made Health Checkup mandatory for each students. So, the students seeking admission in the first year and the student studying at hostel, P. G. students have to do health check-up for which Rs. 11 from college students arecollected.
For the development of oratory skills of the students, Elocution and Debate Competitions are regularly arranged at college and University level.In the same way, Competitions are arranged by social institutions and other Universities. The selected students represent the University in various Competitions conduct at the all universities in Maharashtra.
The Student Development’s Department organizes Late Bhaskar Sabanis Inter-College Commerce Quiz & Presentation Competitionfor the students to develop their skill in Accounting and Costing. This Competition is sponsored by Principal Dr.Anil Rao, Professor Colony, Jalgaon in the memory of his father-in-law the Late. Bhaskar Sabnis.
At the time of earthquake, bomb-blast, fire people lose their lives and many thousands of people becomehomeless. In this time of distress and agony NSS units come forward to help the victims. In order to make the students and the general public aware about such types of disasters, the NSS unit of KBCNMU organize workshops on the Role of NSS in Disaster Management, the basic purpose of thisworkshops on disaster management is to create an effective awareness among the NSS volunteers so that they can play a significant role in disseminating awareness among students regularly organizes and among the masses in general.
There are two Youth Festival Programms in which the University always participates in these youth festivals which are organized at the State and National levels. Ultimately it gives our students an opportunity to understand the different parts of Maharashtra as well as the country. It is an opportunity for the students of KBCNMU, Jalgaon to test their accomplishments at State as well as National levels. This gives them exposure and is a celebration of cultural diversity, difference and unity in diversity. The Dept. of Students’ Development takes special care and interest that the students of the School Department of University/Colleges/ Institutes participate in these festivals with great zest. District - area Inter-collegiate youth festival is and university level youth festival organized by KBCNMU every year.
To promote the art and habit of writing among the students, an annual magazine competition is organized by the Dept. of Students’ Development. This helps students to learn the art of writing, editing, publishing a magazine. All colleges/ institutes are requested to send copies of the magazine published by them to the Director, Dept. of Students ‘Development who in turn submits them to a panel of experts which is appointed by the Hon’ble Vice-Chancellor to judge these magazines and to declare Prizes at the University level as well as District level are awarded to the selected magazine.The Principals are expected to be present to receive them at the Annual Prize Day organized by the Dept. of Students’ Development. The University gives funds for the same. The prizes are distributed at the Annual Prize day function organized by Dept. of Student development KBCNMU Jalgaon.